वाघोली (प्रतिनिधी) : संचार बंदी…लॉक डाऊन. व कोरोना व्हायरसच्या भीतीने, वाघोली गावामध्ये कामा करीता आलेले परप्रातीय लोक घाबरुण आप आपल्या गावात जाण्यासाठी निघाले होते परंतु सर्वत्र संचार बंदी काळात त्यांची लोकप्रतिनिधी व लोणीकंद पोलिसांच्या वतीने समजूत काढून त्यांना थांबवण्यात आले आहे .
नागरिकांवर आलेली उपास मारीची वेळ लक्षात घेऊन वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य,भाऊसाहेब,ग्रामस्थ व लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर साहेब या सर्वांच्या सहकार्याने वाघोली गावात पर राज्यातुन आलेल्या कामगार वर्गाला दि.२९ पासून सकाळी १००० नागरिक व संध्याकाळी जवळपास १००० नागरिकांच्या जेवनाची सोय वाघोली ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात आल्याची माहिती सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली आहे.
ज्या ज्या भागात हे लोकं राहत आहेत त्यांना त्या जागेवर जेवण पोहोच केले जणार आहे असून एका ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली असल्याचे सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे यांनी सांगितले.