पिंपरी: मतदान हा आपला हक्कच नसून कर्तव्य आहे. केवळ सुट्टीचा दिवस म्हणून या दिवसाकडे न पाहता लोकशाहीचा उत्सव समजून प्रत्येक मतदाराने मतदान करायला हवे. मतदानाच्या माध्यमातून विचारपुर्वक एक चांगला उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांनी दैनिक प्रभातशी बोलताना केले आहे.