पिंपळे गुरव – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने रॅलीद्वारे, भित्तीपत्रके, पटनाटय आणि घोषवाक्येद्वारे कृष्णा चौक, काटेपुरम चौक येथे मतदान जनजागृती करण्यात आली. आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका, मतदान सर्वश्रेष्ठ आहे, घ्या मातृभुमीची आण, करा मतदान, आपलं मत विकासाला मत, तुम हो महान करके मतदान, ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदानाची किंमत नाही घेणार पण मतदान मात्र जरूर करणार, अशा विविध प्रकारचे घोषणेद्धारे, स्पीकरमधून नागरिकांना आवाहन करण्यात आले.
शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग फिरण्यासाठी, मौजमजा, भटकंती न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून महाराष्ट्राची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन जोगदंड यांनी केले. यावेळी नागरिकांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी विकास शहाणे, संजना करंजावणे, संगिता जोगदंड, अक्षय जगदाळे, गजानन धाराशिवकर, हनुमंत पंडित, अरविंद मांगले, ज्येठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, प्रकाश बंडेवार, सुरेश पवार, प्रदीप बोरसे, गुणवंत कामगार, गोरख वाघमारे वसंतराव चकटे, इंद्रजित चव्हाण, शिवनारायण पोटे, काळुराम लांडगे, मानिकराव नागपुरे, पंडित वनसकर आदींनी सहभाग नोंदवला.