voting । देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत 23.66 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यांमध्ये किती टक्के मतदान झाले, याचीही आकडेवारी समोर आली आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची टक्केवारी voting ।
बिहार – 21.11 टक्के
जम्मू आणि काश्मीर – 21.37 टक्के
झारखंड – 26.18 टक्के
लडाख – 27.87 टक्के
महाराष्ट्र – 15.93 टक्के
ओडिशा – 21.07 टक्के
उत्तर प्रदेश – २७.७६ टक्के
पश्चिम बंगाल – 32.70 टक्के
49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात voting ।
दरम्यान, पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. आज महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात कमीत कमी (४९) जागांवर मतदान होणार आहे.