नवी दिल्ली – जुलै -सप्टेंबर तिमाहीमध्ये व्होडाफोन कंपनीला 7,145 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 7,218 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर सर्व कंपन्यांनी मोबाईलचे दर वाढविण्याचा सामूहिक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे आणि तोट्याचे प्रमाण कमी होण्यात मदत झाली आहे असे कंपनीने म्हटले आहे.
सरलेल्या तिमाहीच्या शेवटी केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यासाठी मदत जाहीर केली होती. त्यामुळे या तिमाहीत कंपनीच्या ताळेबंदावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. मात्र पुढील तिमाहीमध्ये कंपनीच्या ताळेबंदातील तोटा आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.