नवी दिल्ली – केंद्र सरकार आर्थिक संकटात असलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडला सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल एमटीएनएलमध्ये विलीन करू इच्छित नाही. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल एमटीएनमध्ये विलीनीकरण न करण्याची अनेक कारणं आहेत.
व्होडाफोन आयडिया कर्जबाजारी कंपनी आहे. तसेच व्यवसायात तोटाही होत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. दुसरीकडे व्होडाफोन आयडियाने व्यवस्थापनात कमकुवत धोरणं अवलंबल्याने तोटा सहन करावा लागत आहे
व्होडाफोन आयडियाचे कुमार मंगलम बिर्ला यांच्या वक्तव्यानंतर केंद्र सरकारनं ही भूमिका मांडली आहे. बिर्ला यांनी कंपनीचा 27 टक्के हिस्सा सोपवून व्होडाफोन आयडिया लिमिटेड राष्ट्रहित साधून वाचवायची आहे, असं सांगितलं होतं. निती आयोगानेही या प्रस्तावाचा विरोध केला आहे.
केंद्र सरकार आणि दूरसंचार कंपन्यांना
– सरकारी दूरसंचार कंपन्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे 2019 मध्ये 69 हजार कोटींचं पॅकेज
– आर्थिक वर्ष 2021 अखेरपर्यंत बीएसएनएलची एकूण थकबाकी 81,156कोटी रुपये
– एमटीएनएलची एकूण थकबाकी 29,391 कोटी
व्होडाफोन आयडिया भारतातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनी आहे. यावेळी देशात कंपनीचे 27 कोटी युजर्स आहेत. व्होडाफोन आयडियावर सरकारचं 96,300 कोटींचं कर्ज आहे. त्याचबरोबर एजीआरच्या ड्यूजच्या स्वरुपात 61 हजार कोटींचं कर्ज आहे. व्होडाफोन आयडियाला बँकांचं 23 हजार कोटी देणं आहे. तर कंपनीला 7 हजार कोटींच्या पार नुकसान होत आहे.