नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे जाहीर केलेल्या लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मत करण्यासाठी ३. ६ लाख कोटी रुपये ट्रान्सफर करण्याची योजना आखावी अशी विनंती ३०० अर्थतज्ज्ञ, समाज शास्त्रज्ञ आणि कामगार संघटनांनी केली आहे. हि योजना ४० ते ५० लाख स्थलांतरित बेरोजगार मजुरांच्या दृष्टिकोनातून मांडली आहे.
या पत्राद्वारे लॉक डाऊनमुळे स्थलांतरित कामगार आणि नागरिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे मदतीचे पॅकेज तीन अथवा चार टप्प्यात द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र दि इंडियन सोसायटी ऑफ लेबर इकॉनॉमिकस आणि अन्य मान्यवरांनी पाठवले आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने जन धन योजनेत दरमहा सहा हजार रुपये जमा करून कुटुंबातील महिलेच्या हातात ते मिळतील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही यात केले आहे. या याशिवाय राज्य सरकारने माणशी १० किलो धान्य आणि जीवनावश्यक सामान मोफत द्यावे असेही सुचवले आहे.