मुंबई – अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. त्याचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी फोटोंवरून या कपलच्या साधेपणाचे कौतुक केले. काश्मीर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने देखील विराट अनुष्काच्या या देवदर्शनावर भाष्य केले आहे.
विराट अनुष्का उज्जेन मंदिरात गेल्यानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनुष्का आणि विराट महाकालेश्वर मंदिरात जाण्याबाबत विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काळानुसार माणसे बदलतात असे ते म्हणाले. विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, “मला आठवते की अनेक सोशल मीडिया युजर्सने विराट कोहलीला ट्रोल केले होते जेव्हा त्याने मस्करीत ‘मी पूजा पाठ करणाऱ्यांतला वाटतो का ?’ असे म्हटले होते. लोक बदलतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण बदल हे अर्थपूर्ण जीवनाचे दुसरे नाव आहे” असं अग्निहोत्री म्हणाले आहेत.
I remember a lot of tweet-diggers had trolled a young Virat Kohli when he had said jokingly “do I look like pooja paath types”.
People change. And it’s a great thing. Because change is another name of a meaningful life. pic.twitter.com/OxCeYFkxuU
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 4, 2023
काय म्हणाला होता विराट नेमकं त्यावेळी
विवेक अग्निहोत्री ज्या विधानाचा संदर्भ देत आहेत ते 7 वर्षे जुने आहे. T20 विश्वचषकाच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने विराटला विचारले की तो दबावाच्या परिस्थितीत शांत होण्यासाठी ‘पूजा-पाठ’ प्रार्थना करतो का? विराट म्हणाला होता, ‘मी पूजा पाठ करणारा वाटतो का? विराटच्या या विधानावर बरीच टीका झाली होती.
काल विराट अनुष्का यांनी सर्वसामान्यांप्रमाणे उज्जेन मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या भस्म आरतीमध्ये अनुष्का विराटचा समावेश होता, तसेच त्यांनी आरतीनंतर अभिषेकही केला. सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्काची ही छायाचित्रे पाहून चाहते खूप खुश दिसत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकदा त्यांची मुलगी वामिकासह वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात.