धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रीचा यशस्वी संगम झाल्यावर माणसातील माणूसपण आणि नेत्यातील नेतृत्वाला पराकोटींची उंची प्राप्त होते. असे कार्यक्षम, अभ्यासू सर्वसामान्य जनतेचे हित पाहणारे सर्वांचे लाडके व लोकप्रिय नेतृत्व म्हणजे आंबेगाव, शिरूर तालुक्याचे भाग्यविधाते कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या नेत्यांचा उल्लेख करताना खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर त्यांचे नाव येते. राजकारणाबरोबर अर्थकारण, समाजकारण व दूरदृष्टी असलेले नेते बोटावर मोजण्याइतकेच सापडतील. यशवंतराव, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरदचंद्रजी पवार या नामवंत नेत्यांप्रमाणेच सर्व क्षेत्रांत व सर्वस्पर्शी असणारे नेते म्हणून जर कोणते नाव सध्याच्या नेत्यांमध्ये घेतले जाते तर ते मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचेच.
आधुनिक महाराष्ट्राला जडणघडणीसाठी विधायक आणि रचनात्मक दिशा देण्यासाठी जे बहुविध प्रयत्न सुरू आहेत, अशा नेतृत्वात मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव निश्चितपणे अग्रस्थानी आहे. 21व्या शतकातील विविध आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी तसेच जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण गतिमान प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मंत्री पदाच्या कालखंडात वळसे पाटील यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.
“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या वृत्तीप्रमाणे 30 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेगाव तालुक्यात घोडनदी तीरावर वसलेल्या निरगुडसर या गावी तालुक्याचे माजी आमदार सहकारमहर्षी कै. दत्तात्रय वळसे पाटील यांना पुत्ररत्न झाले ते दिलीपराव वळसे पाटील. लहानपणापासूनच समाजकारण, राजकारणाचे बाळकडू त्यांना आपल्या पित्याकडूनच मिळाले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात लहानपण गेल्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी माणसाच्या व्यथा, वेदना, विद्रोह, दुःख काय असते हे जवळून ते अभ्यासत होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरगुडसरसारख्या खेडेगावात पूर्ण केले.
सुविधा नसल्यामुळे साहेबांच्या वडिलांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. कायदा व सुव्यवस्था या गोष्टीत साहेबांना रस असल्याने त्यांनी विधी शाखेत प्रवेश घेतला. मुंबईसारख्या शहरातील राहणीमान, गतिमान जीवन त्याचबरोबर प्रगतीची वाटचाल याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी त्याचवेळी केला. चार भिंतीच्या आत चाकोरीबद्ध जीवन जगण्याचे स्वप्न मुळातच त्यांना आवडत नव्हते. काहीतरी समाजासाठी करायचे या दूरदृष्टी विचारसरणीत विधी शाखेची पदवी संपादन करून समाजाची जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला.
मुलाचे समाजातील बोलणे, राहणीमान, राजकारणाबरोबर समाजकारणाचे वेड या गुणांची ओळख पटल्यावर वडिलांनी त्यांना शरद पवार यांच्याकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. साहेबांमध्ये असणाऱ्या गुणांची पारख करून स्वतःचे खासगी सचिव म्हणून काम करण्याची संधी पवार साहेबांनी दिली. ही सुवर्णसंधी लक्षात घेऊन साहेबांनी तत्परतेने काम करण्यास सुरुवात केली. सातत्य, सचोटी, अभ्यास, व्यासंग या बळावर मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार साहेबांमुळे राजकीय क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रात विविध प्रश्नांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करता आला.
सन 1985 नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या काळात युवकांना संघटित करून पक्षाची पायाभरणी करताना युवकांपर्यत प्रभावीपणे पोहोचणे सहजरीत्या शक्य झाले. 1990 साली आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील विकासाचा आराखडा तयार करून घेतला. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिंभे धरणाचे राहिलेले काम, डावा व उजवा कालवा घोडनदीवरील केटी बंधारे, लिफ्ट इरिगेशन योजना, कुपनलिका आदी कामांना वेग देऊन तालुक्यातील क्षेत्र बागायत करून तालुक्यातील पडीक माळरानावर नंदनवन फुलवले.
सुरुवातीला पूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, साखर कारखाने, रस्ते, पाझर तलाव, शेततळी, प्राथमिक आरोग्य केद्रे, ग्रामीण रुग्णालय, वीजकेंद्रे, क्रीडांगणे, संगणकीय शाळा तसेच तालुक्यातील मुलां-मुलींना आयटी क्षेत्रात प्रगतीची वाटचाल करण्यासाठी अवसरी येथे इंजिनिअरिंग कॉलेज आदी योजना राबविल्या.
शब्द माझे जहाल असेल, वाक्य माझी तलवार असेल,
आणि साहेबांची चरित्र माझी ढाल असेल,
अशा नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.– देवदत्त निकम
सभापती मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती