भुवनेश्वर : भुवनेश्वरहून सिकंदराबादला जाणाऱ्या विशाखा एक्सप्रेसचे काही डबेच इंजिनपासून वेगळे झाले. मात्र तरीही मोठी दुघटना टळली. ही घटना शनिवारी ओडिशामध्ये घडली.
खुर्दा जिल्ह्यात बालुगाव रेल्वेस्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर काही क्षणातच हा अश्चर्यकारक प्रकार घडला. इंजिनसोबत केवळ त्यामागील वातानुकुलीत डबे पुढे गेले. बाकीचे डबे तसेच स्थानकावर राहिले. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. भुवनेश्वरमधून निघालेल्या या गाडीचे डबे सुटले.
वातानुकुलीत कक्ष आणि एस 1 बोगीच्या दरम्यान हे डबे तुटले. दोन्ही डब्यांना जोडणाऱ्या सांध्यांमध्ये काही तरी गडबड झाल्याने ही घटना घडली. हे डबे पुन्हा जोडल्यावर ही रेल्वे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुढे रवाना झाली. या रेल्वेची नंतर नियमित तपासणी करण्यात आली. बह्मपूर आणि विशाखापट्टणम येथेही त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच बोगी दुरूस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेसोबत पाठवण्यात आले होते अशी माहिती पूर्व किनारावर्ती रेल्वेने दिली आहे.