ICC T20 Team of the Year – ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र सेमीफायनलच्या टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव पत्कारावा लागला. यानंतर भारतीय संघावर आणि संघ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. भारताला या मोठ्या स्पर्धेत अपयश तर आले, पण संघातील विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी भरपूर धावा केल्या. विराट कोहली याच स्पर्धेपासून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याने पाहायला मिळाले. त्याच्या फलंदाजीत आत्मविश्वास आणि चमकही दिसली. त्याचबरोबर सूर्यकुमारनेही आपल्या ३६० डिग्री फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
दरम्यान, आयसीसीने २०२२ या वर्षातील टी२० क्रिकेटचा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांना स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन खेळाडूची या संघासाठी निवड केली आहे. तर न्यूझीलंड, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला या संघात स्थान देण्यात आलं आहे. संघासाठी कर्णधारपदी जोस बटलरला निवडण्यात आलं आहे. बटलरसाठी मागील वर्ष खेळाडू आणि कर्णधार म्हणून उत्कृष्ट राहिले. २०२२ मध्येच इयान मॉर्गनने निवृत्ती घेतल्यानंतर टी-२० संघाचे कर्णधार पद बटलरकडे आलं. त्यानंतर त्याने पहिल्याच आयसीसी स्पर्धेत नेतृत्व करताना संघाला विश्वविजेता बनवलं.
भारतीय संघाने मागील काही काळात टी-२० क्रिकेटच्या द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे भारताच्या तीन खेळाडूंना या आयसीसीच्या संघात स्थान मिळाले. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे. विराट टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्याने मागील वर्षात २० सामन्यांमध्ये ५५ पेक्षा जास्त सरासरी आणि १३८ च्या स्ट्राइक रेटने ७८१ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले ७१वे आणि टी-२० क्रिकेटमधील पहिले शतकाही झळकावले.
The best T20I players from India in 2022 🔥🔥#CricketTwitter #india pic.twitter.com/rj76EsQwCb
— Sportskeeda (@Sportskeeda) January 23, 2023
सूर्यकुमार यादवची त्याच्या खेळण्याच्या शैलीवरून एबी डिव्हिलियर्सशी ‘३६० डिग्री खेळाडू’ तुलना केली जात आहे. मागील वर्षभरात टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने सर्वाधिक धावा फाटकावल्या आहेत. त्याने खेळलेल्या ३१ सामन्यांत १८७.४३ च्या स्ट्राइक रेटने आणि ४६.५६ च्या सरासरीने ११६४ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने गेल्या वर्षात दोन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची कामगिरी पाहता त्याचाही या संघात समावेश करण्यात आलाय. त्याने मागील वर्षात उत्कृष्ट अष्टपैलू खेळ दाखवला आहे. हार्दिकने यादरम्यान फलंदाजीत ६०७ धावा आणि गोलंदाजीत २० बळी घेतले आहेत.
Virat Kohli, Suryakumar Yadav and Hardik Pandya included in the ICC 2022 T20 Team of the year 🤩#CricketTwitter #india pic.twitter.com/Mnyx5IzGzD
— Sportskeeda (@Sportskeeda) January 23, 2023