T20 Cricket : विराट कोहलीने ( Virat Kohli ) मागील तीन वर्षांच्या काळात त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ पहिला आहे. कारण विराटने त्याचे क्रिकेटमधील ७० वे शतक २०१९ मध्ये साकारले होते. त्यानंतर ७१ व्या शतकासाठी त्याला तब्बल ३ वर्षांची वाट पाहावी लागली. शेवटी आशिया चषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने ७१ वे शतक ठोकले.
महत्वाचे म्हणजे विराटने टी-२० ( T20 Cricket ) क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकीय खेळी खेळली आहे. त्यामुळे विराटच्या या खेळीने लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आनंद साजरा केला. आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकसाठी विराट कोहलीने धावा करणे अत्यंत गरजेचे होते. कारण कितीही नाही म्हटले तरी विराट विना भारतीय संघाची फलंदाजी अपुरी आहे.
विराटची टी-२० ( T20 Cricket ) क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाची कामगिरी अत्यंत अफाट अशी आहे. त्याचेच एक महत्वाचे उदाहरण कालच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या निर्णायक सामन्यात पाहायला मिळाले.
विराट कोहलीने (Virat Kohli) भारताकडून टी-२० क्रिकेट खेळताना दमदार कामगिरी केलेली आहे. धावांच्या पाठलाग करताना विराट कोहलीच्या हजेरीत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्याने याबाबतीत सर्वाधिक १५३६ धावा ठोकल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये पाठलाग करताना विराट कोहलीने ३७ सामन्यांच्या ३४ डावांमध्ये ९०.३५ च्या सरासरीने १५३६ धावा केल्या आहेत.
क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये धावांचा पाठलाग करताना कोहलीने आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही. परंतु त्याने यादरम्यान १५ अर्धशतके केली आहेत. धावांचा पाठलाग करताना त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ९४ आहे. याच यादीत डेव्हिड वॉर्नर ११९५ डावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादरम्यान त्याची सरासरी ४१.२० अशी राहिली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा ११९३ धावांसह तिसर्या क्रमांकावर आहे. यादरम्यान त्याची सरासरी २९.८२ अशी राहिली आहे. बाबर आझम चौथ्या क्रमांकावर असून त्याने पाठलाग करताना १०१८ धावा केल्या आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल ९०२ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.