नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर बायोबबलमधून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणाने बाहेर पडला होता. आता आयपीएल स्पर्धेपूर्वी तो बायोबबलमध्ये परतणार असला तरीही त्यापूर्वी त्याला किमान आठ दिवस विलगीकरणात घालवावे लागणार आहेत, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीसह सर्व खेळाडू बायोबबलमध्येच राहात होते. त्यांना यातून बाहेर जाता येत नव्हते तसेच त्यांना बायोबबलच्या बाहेरील व्यक्तीही भेटू शकत नव्हत्या. मात्र, इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यावर कोहलीने वैयक्तिक कारणाने बाहेर जाण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली होती. आता मात्र, आयपीएलपूर्वी त्याला पुन्हा विलगीकरणात राहावे लागणार आहे.