नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सातत्याने अपयशी ठरला तसेच त्याची अशीच सुमार कामगिरी आयपीएल स्पर्धेतही दिसली. खरेतर त्याला विश्रांतीची गरज आहे. तो थकलेला आहे मात्र, तरीही तो सामन्यांतून विश्रांती न घेता खेळत राहिला. तो स्वतःला फसवत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने व्यक्त केले आहे.
केवळ कोहलीच नाही तर जगभरातील अनेक खेळाडू संघातील स्थान जाऊ नये यासाठी आपण थकलो आहोत हेच मान्य करत नाहीत व त्यामुळेच त्यांची कामगिरी खालावते, असेही पॉंटिंगने म्हटले आहे.