अॅडलेड – अजिंक्य रहाणेसह फलंदाजी करत असताना भारताचा कर्णधार विराट कोहली धावबाद झाला. यासाठी भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी रहाणेला जबाबदार ठरवले आहे.
नाथन लायननच्या त्या चेंडूवर धाव मिळण्याची शक्यताच नव्हती, तरीही रहाणेने कोहलीला कॉल दिला. क्षेत्ररक्षक खूप जवळ उभा होता हे रहाणेला कसे लक्षात आले नाही. ही चूक रहाणेचीच होती. तरीही कोहलीने त्यावर आपला संताप व्यक्त केला नाही. मात्र, रहाणेच्याच चुकीमुळे कोहलीची एक अफलातून खेळी संपली, अशा शब्दात मांजरेकर यांनी रहाणेला खडे बोल सुनावले आहेत.
कोहलीने बाद झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याने संयमही राखला. सामन्यात असे प्रसंग खूप दुर्दैवी असतात. मात्र, कोहली केवळ रहाणेच्याच चुकीमुळेच बाद झाला. कोहलीने रहाणेसह चौथ्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. परंतू नाथन लायनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना कोहली 74 धावांवर धावबाद झाला होता.