DC vs RCB Virat Kohli and KL Rahul’s Heated Exchange Video Viral : दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना २७ एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवून मागील पराभवाचा बदला घेतला. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केएल राहुल आणि विराट कोहली एकमेकांशी जोरदार वाद घालताना दिसत आहेत.
मैदानातच विराट-राहुलमध्ये रंगला वादंग –
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून १६३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने सामना जिंकला. दरम्यान, सामन्यादरम्यान विराट कोहली आणि केएल राहुलमध्ये जोरदार वादंग पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Things are heating up in Delhi! 🔥#ViratKohli and #KLRahul exchange a few words in this nail-biting match between #DC and #RCB. 💪
Watch the LIVE action ➡ https://t.co/2H6bmSltQD#IPLonJioStar 👉 #DCvRCB | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2, Star… pic.twitter.com/Oy2SPOjApz
— Star Sports (@StarSportsIndia) April 27, 2025
खरं तर ही घटना सामन्याच्या ८ व्या षटकात घडली. जेव्हा कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. यावेळी, विराट कोहली स्ट्राईकवर होता, तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार क्षेत्ररक्षणात बदल करत होता. विलंबामुळे नाराज झालेला विराट कोहली विकेटच्या मागे जाऊन रागाने केएल राहुलला काहीतरी बोलताना दिसतो. प्रत्युत्तरादाखल, राहुल देखील कोहलीला काही उत्तर देताना दिसतो. जरी दोघांचे काही आवाज स्टम्प माइकमध्ये कैद झाले असले तरी ते इतके अस्पष्ट आहेत की ते समजणे कठीण आहे.
हेही वाचा – DC vs RCB : आरसीबीने दिल्लीचा धुव्वा उडवत पटकावले अव्वल स्थान, विराट-कृणालने झळकावली अर्धशतकं
पियुष चावलाने केला खुलासा –
सामन्यानंतर घडलेल्या घटनेबद्दल बोलताना पियुष चावला म्हणाले की, दिल्लीच्या क्षेत्ररक्षणात होणाऱ्या विलंबामुळे विराट कोहली खूप नाराज होता आणि तो राहुलकडे याबद्दल तक्रार करत होता. त्यावर उत्तर देताना राहुल म्हणाला की, जर त्याने क्षेत्ररक्षणात जास्त वेळ घेतला तर त्याच्यात संघाला नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.