मुंबई: बहुप्रतिक्षित T20 वर्ल्ड कपला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघ पुढील वेळापत्रकही समोर आलं आहे. भारतीय संघ चार विविध देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यावेळी न्यूझीलंडचा दौैरा सर्वात पहिला असून यादरम्यान टी20 सामन्यांवेळी रोहित शर्मा, विराट यांच्यासह वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती म्हणून संघाबाहेर ठेवलं जाणार आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘अधिक भारतीय खेळाडू विशेषत: वरिष्ठ खेळाडू हे मागील बरेच महिने विविध दौऱ्यांमुळे सतत बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपनंतर त्यांना काहीशी विश्रांती देण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सामन्यात त्यांना संघाबाहेर ठेवले जाणार आहे. यामध्ये कोहली, बुमराह, शर्मा आणि शमी यांची नाव असतील. यावेळी ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.
विश्वचषकाची फायनल 14 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड संघाच्या दौऱ्याची सुरुवात होईल. या दौऱ्यात 3 टी20 सामन्यांसह 2 कसोटी सामनेही खेळवले जाणार आहे. दरम्यान कसोटी सामने हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे आधी होणाऱ्या टी20 मालिकेवेळी भारताच्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासारखी नावं आहेत.
श्रीलंका दौऱ्यावर भारताचा मुख्य प्रशिक्षक असणारा राहुल द्रविड याला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठीही हेड कोच केलं जाऊ शकतं. टी20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक पद सोडणार आहेत. तोवर दुसरा प्रशिक्षक नेमणार की नाही हे अद्याप माहित नसल्याने त्यावेळी राहुललाच ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.