बेंगळुरू – बेंगळुरूतील हिंसेमुळे मोठ्या प्रमाणावर भांडवलहानी झाली होती. या हिंसेचा फटका बसलेल्या नागरिकांमध्ये अजूनही भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.
ही हिंसा 11 ऑगस्टला घडली होती. यावेळी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने तात्काळ बंद केली. कारण त्याठिकाणी हिंसाचार सुरू झाला होता. या हिंसाचारात दुकाने आणि वाहने जाळण्यात आली होती. या हिंसेत लोकांनी रोकड, सोने चांदी आणि घरातील फर्निचर यासारख्या किमती वस्तू गमावल्या.
एका फेसबुक पोस्टवरून बेंगळुरूत मागील दिवसांत हिंसाचार घडून आला. गर्दीने एका आमदार आणि पोलीस स्टेशनवर हल्ला केला. यात तीन लोकांचा मृत्यू झाला. तर 60 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. गर्दीने गोंधळ घालत जवळपास 250 पेक्षा अधिक वाहनांची जाळपोळ केली होती.
या हिंसेचा तपास बेंगळुरू पोलीस करत आहे. मात्र या हिंसेचा फटका बसलेल्या नागरिकांनी आता कोणतीही उमेद नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.