मुंबई – माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास कच्चा आहे. आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही कॉंग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते. तर तो निर्णय घेतला नसता, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
तसेच निलेश यांनी मिलींद नार्वेकरांना तिकीटं विकणारा एजंट आहे म्हणत खिल्ली उडवली आहे.आमच्यावर कोणती कारवाई होती विनायक राउत यांनी सांगावे, नाहीतर राजकारण सोडावे. ते पुराव्याच्या आधारावर कधी बोलत नाहीत. शिवसेनेत तिकिट वाचवण्यासाठी ते आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे.
नेते पद नव्हते तरी त्यांना राणे साहेबांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं ना. विनायक राऊतांना साधे मंत्रीही नाही केले. राणे साहेबांचे काय वजन आहे शिवसेनेत ते 2005 साली आणि त्या आधीच दाखवले आहे. विनायक राउत यांनी स्वत:चे वजन बघावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
नारायण राणेंची नेता व्हायची लायकी नव्हती म्हणून बाळासाहेबांनी त्यांना नेतेपद दिले नाही. संजय राऊतांना बाळासाहेबांनी नेते बनवले होते. अशी टीका काही वेळापूर्वीच विनायक राऊत यांनी केली होती. त्यालाचा निलेश राणे यांनी जोरादार प्रत्युत्तर दिले आहे.