नवी दिल्ली – भारतीय संघात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला संघ व्यवस्थापनाने केलेल्या शिफारसीमुळेच संधी देण्यात आली, असा खुलासा भारतीय संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केला आहे.
महेंद्रसिंग धोनी याने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यामुळे संघाला एका यष्टिरक्षक फलंदाजाची नितांत आवश्यकता होती. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांनी पंतच्या नावाला पसंती दिली. संघाच्या विजयानंतर कामगिरी केलेल्या खेळाडूचे गुणगान होते. मात्र, पराभवानंतर प्रशिक्षक व कर्णधारालाच दोष दिला जातो. त्यामुळे या दोघांच्या मताचा आदर करत पंतचा संघात समावेश करण्यात आला, असेही राठोड यांनी सांगितले.