जयपूर – सलामीवीर पृथ्वी शॉ याचे द्विशतक तर सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी (दि.25) झालेल्या साखळी सामन्यात चारशेपेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर प्रशांत सोळंकीच्या अचूक गोलंदाजीने पद्दूचेरीचा डाव 224 धावांवर संपवला व 23 धावांनी मोठा विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या शॉने 152 चेंडूत 31 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 227 धावांची खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना यादवने केवळ 58 चेंडूत 22 चौकार व 4 षटकार फटकावताना 133 धावांची खेळी केली.
या दोघांच्या फलंदाजीमुळे मुंबईने 4 बाद 457 धावांचा डोंगर उभा केला. विजयासाठी 458 धावांचा पाठलाग करताना सोळंकीने पद्दूचेरीची फलंदाजी उध्वस्त केली. दामोदरन रोहित 63 व सागर त्रिवेदी 43 यांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाजी खेळपट्टीवर टीकू शकला नाही व त्यांचा डाव 39 व्या षटकांत 224 धावांवर संपला.