नाशिक : राज्यात मान्सून सक्रीय झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात नाशिक मध्ये देखील दमदार पाऊस पडल्याने पंचवटी परिसरातील गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील उमापासून ते थेट नाशिक शहरापर्यंत अनेक मंदिरे, वाहने पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, जिल्याच्या या दमदार पावसामुळे अनके गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.