संगीतकार शांतनू मोईत्रा यांनी “परिणिता’ चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, विद्या बालनचे तिच्या भूमिकेसाठी तब्बल 75 वेळा ऑडिशन घ्यावे लागले. प्रदीप सरकार दिग्दर्शित या
चित्रपटात सैफ अली खान, संजय दत्त आणि दिया मिर्झा यांनीही मुख्य भूमिका केली होती.
या चित्रपटातील आपले अनुभव सांगताना शांतनू म्हणाले, “परिणिता’बद्दलची माझी सगळ्यात चांगली आठवण म्हणजे विधु विनोद चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये आमच्यासोबत बसलेल्या ती एक मुलगी.
ज्यानंतर आम्ही हळूहळू मित्र बनलो.
शांतनू म्हणाले, मी तिला विचारले की तू येथे काय करत आहे असे विचारल्यावर तिने येथे ऑडिशनसाठी आल्याचे सांगितले. ती मुलगी म्हणजे विद्या बालन होय. या मुलीने 75 वेळा ऑडिशन दिले आणि प्रत्येक वेळी तिला रिजेक्ट करण्यात आले. त्यावेळी बऱ्याच आघाडीच्या अभिनेत्री ऑडिशन देत होत्या आणि त्यांनाही या पात्रासाठी बोलावले जात होते!
अखेर “परिणिता’साठी विद्याचे सिलेक्शन करण्यात आले. त्यानंतर कोणीतरी तिला मॅसेज केला की, प्रतीक्षा संपली आहे, तूच परिणिता आहेस. मला वाटतं की हा मॅसेज वाचल्यावर ती नक्कीच रडत असावी.
पण चित्रपटानंतर ती एक उत्कृष्ट अभिनेत्री, एक मजबूत स्त्री बनली. कारण 75 वेळा नाकारल्यानंतरही मी तिला कधीच कमकुवत पाहिले नाही, असे शांतनू मोईत्रा यांनी सांगितले.