नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर – राज्यातील काही भागांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र पाण्याचे प्रमाण जास्त वाढल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा नदी पाणी पातळी 33 फुटांवर गेली आहे. तर 7 प्रकल्पातून नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात 11 घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. पंचगंगा, भोगावती, कासारी नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणं 85 टक्के भरलं आहे. तर 30 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 2 राज्य मार्ग आणि 1 जिल्हा मार्ग बंद आहे. मात्र पर्यायी मार्गाने येथे वाहतूक सुरू आहे. राधानगरी, आजरा, गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची अवाक झाली आहे.