कोल्हापूर – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा अहमदनगरचा पालकमंत्रिपद का नको याच्यावर कोल्हापुरात खुलासा केला आहे. अहमदनगरच्या पालक मंत्री पदावर न राहण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कळवला आहे.
कोल्हापूर आणि अहमदनगर मध्ये एकाच वेळी निवडणुका होत आहेत दोन्ही जिल्ह्या कडे लक्ष देता येणार नाही म्हणून कोल्हापूरची जबाबदारी माझ्यावर द्यावी अशी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे.
याचा अर्थ कोल्हापूरचे पालकमंत्री पद मागतोय असा होत नाही. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.