मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत आक्रमक भाषेत बोचरी टीका केली. यावरून राजकारण चांगलेच तापले असतांना आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावं अशी मागणी पडळकरांनी पत्रातून केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावं अशी मागणी संदर्भातील व्हिडिओ गोपीचंद पडळकर यांनी फेसबूकवर शेअर केला आहे. फेसबुकवर त्यांनी या संदर्भात पोस्ट लिहिली आहे की,’हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या, जय मल्हार..’ असं म्हणत त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याची मागणी केली आहे.
पहा व्हिडिओ