कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यातील कोरोनाच्या एकूणच परिस्थितीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकार कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय मदत पुरविण्यात कमी पडत असल्यामुळे त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे.
राज्यात कोरोनामुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असून राज्य सरकारनं चांगल्या दर्जाचे टेस्टिंग किट वापरणे गरजेचे आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.
म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मेडिकल व्यवस्थेवर जास्त भर देण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्यात मेडिकल व्यवस्थेवर आपण जास्त भर देत नसून लॉक डाउन वर भर देत आहोत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.