नवी दिल्ली : भाजपाच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना एका महामार्गावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमारात सुमारे १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कर्नालचे उप न्यायदंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते पोलिसांना विरोध करणाऱ्यांचे चक्क डोके फोडण्याचा पोलिसांना आदेश देत आहेत.
उप न्यायदंडाधिकारी आयुष हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पोलिसांना शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे लेखी आदेशही देत आहेत. आयुष अनेक पोलिसांसमोर उभे आहेत आणि त्यांना कडक शब्दात सूचना देत आहे की “हे अगदी स्पष्ट आहे, तो कोणीही असो, कुठलाही असो त्याला जाऊ देऊ नका. येथून कोणालाही पुढे जाऊ देऊ नका. आपली काठी उचला आणि जोरात मारा. कोणत्याही सूचनांची आवश्यकता नाही, फक्त जोरात मारायचे आहे. जर मला इथे एकही आंदोलक दिसला तर त्याचे डोके फुटलेलं पाहिजे. काही शंका आहे का? “पोलीस उत्तर देतात, ‘नाही सर’.”
आज करनाल में CM खट्टर व भाजपा के सभी MP,MLA की कोई बैठक है, किसानों के डर से करनाल सील है।
ये ड्युटी मजिस्ट्रेट कह रहे हैं कि यहां कोई नहीं आना चाहिए उठा उठा कर मारना, सिर फोड़ देना, पूरी छूट है। ऐसा क्यों?
आख़िर इतनी दरिंदगी तो अंग्रेजो ने भी अपने लोगो के साथ नही किया होगा। pic.twitter.com/W3YYxTyaPy
— MLA Naresh Balyan (@AAPNareshBalyan) August 28, 2021
शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची बातमी ऐकल्यानंतर इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने पोहोचून रस्ता रोको केला. दिल्ली आणि चंदीगडला जोडणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, भाजपा नेते वरुण गांधी यांनीही तो शेअर केला आणि म्हटले, “मला आशा आहे की हा व्हिडिओ एडिट केला गेला असेल आणि उप न्यायदंडाधिकाऱ्याने तसे म्हटले नाही … अन्यथा लोकशाही असलेल्या भारतात आमच्या नागरिकांसोबत असे करणे अस्वीकार्य आहे.”
I hope this video is edited and the DM did not say this… Otherwise, this is unacceptable in democratic India to do to our own citizens. pic.twitter.com/rWRFSD2FRH
— Varun Gandhi (@varungandhi80) August 28, 2021
कर्नाल येथे निदर्शने करत असलेल्या शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा काँग्रेसने निषेध केला असून, हरियाणातील भाजपा-जेजेपी राजवटीची तुलना ‘जनरल डायर सरकारशी’ केली आहे. या लाठीमारानंतर रक्तबंबाळ कपड्यांसह एका शेतकऱ्याचे छायाचित्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर टाकले. ‘पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे रक्त सांडले असून, भारताची मान लाजेने झुकली आहे’, असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या हल्ल्याचा निषेध करताना भाजपा- जेजेपी सरकारचे वर्णन ‘जनरल डायरचे सरकार’ असे केले आहे.