बेल्हे (वार्ताहर):- बेल्हे (ता.जुन्नर) दुष्काळ,अतिवृष्टी, कोरोना व आता चक्रीवादळ यामुळे शेतकरी खचून गेला आहे. आंबा,डाळिंब,पालेभाज्या,सीताफळ,केळी, ऊस,जनावरांचा चार अस प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
बळीराजा हवालदिल झाला असून संकटावर संकट येत आहेत. अस प्रतिपादन बेल्हे येथील प्रगतशील शेतकरी दत्ता खोमणे यांनी केलं आहे. आजपर्यंत सरकारने अनेक सुविधा दिल्या मात्र आता काही महत्वाच्या आणि भरीव प्रकारच्या मदतीसाठी शेतकरी आसुसला आहे. नाही तर शेतकरी कधीच उभा राहु शकणार नाही.
दरम्यान, निसर्ग चक्रिवादळाची तिव्रता प्रचंड प्रमाणात असल्यामुळे शेती सोबतच अनेक घरांचीही छपरं उडाली आहेत.