पीक वाढीसाठी पोषक वातावरण
आवक वाढल्याने दर पूर्वपदावर
पुणे – पाऊस थांबल्याने आता वातावरणातील गारठा वाढू लागला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. बाजारात आता ताज्या भाजीपाल्याची आवक होऊ लागली आहे. आवकही वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर पूर्वपदावर आले आहेत.
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली होती. भाजीचे मळे पाण्यात वाहून गेले. त्यामुळे भाजीपाल्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यातून जो भाजीपाला पीकत होता, तो पुरशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे भाज्यांचे दर दप्पट-तिप्पटीने महागले होते. मात्र, पाऊस ओसरल्यानंतर आवक वाढून भाजीपाल्याची स्थिती पूर्वपदावर आली आहे. घाऊक बाजारात मोठी आवक होत आहे. त्यामुळे दरही उतरले आहेत.
पुन्हा ताज्या भाजीपाल्याचा आहारात समावेश
फळभाज्या व पालेभाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांसह खानावळींमध्ये कडधान्यांचा वापर वाढला होता. मात्र, पुन्हा भाजीपाल्याचे दर आवाक्यात आल्याने ताज्या भाजीपाल्याचा आहारात समावेश होऊ लागला आहे.