नगर – आज गौरींचे आगमन होणार असल्यामुळे शहरातील बाजारपेठ सजली. घरोघरी गौरींच्या आगमनाची तयारी सुरू आहे. गौरींच्या आगमनामुळे बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.
जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी पातळी खालावलेलीच आहेत. दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांनी भाजीपाला जेमतेम पीकवल्याने भाजीपाल्याची आवक कमी आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली. त्यामुळे भाजीपाल्यांची आवक घटली. अशातच गणेशोत्सव, गौरीपूजन आल्यामुळे भाजीपाल्यांच्या भाव मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात किलोमागे तीन – चार रुपयांनी वाढलेले आहेत.
गौरी पूजनाच्या दिवशी गौरींना नैवेद्य दाखवतात. त्यात 16 भाज्यांचा समावेश असतो. गृहिणींची गौरी आगमनाची तयारी चालू आहे. गृहिणी भाजीपाल्याची खरेदी सध्या सुरू आहे. बाजारात वांगी 70 रुपये किलो, कांदे 40 रुपये किलो, गवार 30 रुपये पाव, तोडके 60 रुपये किलो, काकडी 30 रुपये, कारले 50 रुपये किलो, गाजर 70 रुपये किलो, बटाटे 20 रुपये किलो, टोमॅटो 30 रुपये किलो, भेंडी 60 किलो, श्रावण घेवडा रुपये किलो, फुलकोबी 60 रुपये किलो, पान कोबी 40 रुपये किलो, वाटाणा 80 रुपये किलो, कोथिंबीर 10, पालक 10, भेंडी 30, तोंडली 30, दुधी भोपळा 30 रुपये असे भाव आहेत. शुक्रवारी देवीच्यानै वेध्यात सोळाभाज्यांचा वापर करण्याची रीत असल्याने त्यादिवशी याभाज्या केल्या जातात. देवीला नैवेध्य दाखविल्या नंतर सव्वाष्ण महिलेला जेवू घालण्याची प्रथा पुर्वीपासून रुढ झाली आहे.