नवी दिल्ली – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या “सनराइज ओव्हर अयोध्या” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात वीर सावरकरांनी गोमांस खाणे चुकीचे मानले नाही असे म्हटले आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले की,’वीर सावरकरांनी गोमांस खाणे चुकीचे मानले नाही. सावरकर हे धार्मिक नव्हते असे आणि गायीला माता मानण्याची काय गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते. गोमांस खाण्यातही अडचण येऊ नये, असे सावरकरांचे म्हणणे होते असेही ते म्हणाले.
#WATCH | Congress’ Digvijaya Singh says “…’Hindtuva’ has nothing to do with Hinduism. Savarkar wasn’t religious.He had said why is cow considered ‘maata’ & had no problem in consuming beef. He brought ‘Hindutva’ word to establish Hindu identity which caused confusion in people” pic.twitter.com/y4zde6RtDM
— ANI (@ANI) November 10, 2021
ते पुढे म्हणाले, सावरकरांनी हिंदुत्व हा शद्ब हिंदूची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचारात आणला. त्याच्यापुढे हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाही. पण भाजप पक्षाने हिंदुत्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.