जयपुर – सध्या पुरूषांच्या आयपीएल स्पर्धे प्रमाणेच महिलांची आयपीएल स्पर्धा देखील सुरू असऊन ही स्पर्धा महिलांच्या उत्कृष्ठ कामगिरीने गाजत असतानाच भारतीय संघातील खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे देखील तितकीच गाजत आहे. मात्र, यावर भारतीय संघातील फिरकी गोलंदाज वेदा कृष्णमुर्तीने भारतीय खेळाडूंची पाठराखण करताना सांगितले की, आम्ही आता पर्यंत डे-नाईट प्रकारातील सामने खुप कमी प्रमाणात खेळलो आहोत त्यामुळे कृत्रीम प्रकाशात चेंडूचा अंदाज घेण्यात आमची चुक होत आहे आणि त्यामुळे आमचे क्षेत्ररक्षण खराब होत आहे.
यावेळी सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी दरम्यान झालेल्या सामन्यात व्हेलॉसिटीच्या संघाने सामना 12 धावांनी गमावला असला तरी त्यांचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला असून अंतिम फेरीत त्यांचा सामना पुन्हा सुपरनोव्हाज संघाबरोबर होणार आहे. यावेळी सामन्यानंतर त्यांना सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंकडून झालेल्या खराब क्षेत्ररक्षणाबद्दल छेडले असता तिने सांगितले की, आमच्या संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी दिवस-रात्र प्रकारात खूप कमी सामने खेळले आहेत. ज्यावेळी तुम्ही पारंपारीक सुर्यप्रकाशात खेळता तेंव्हा सुर्य प्रकाशात चेंडूचा तुम्हाला व्यवस्थीत अंदाज येत असतो.
मात्र, ज्यावेळी तुम्ही दिवस-रात्र प्रकारातील सामने खेळता तेंव्हा तुमचा चेंडूचा अंदाज चुकतो. कारण, चेंडू कश्या प्रकारे फिरतोय अथवा किती वेगाने येतोय याचा अंदाज घेण्यत प्रकाशाचा वाटा मोठा असतो. मात्र, रात्रीच्या वेळी कृत्रीम प्रकाशात चेंडू किती वेगाने प्रवास करतोय नेमका तोच अंदाज घेता येत नाही आणि त्याचा आम्हाला जास्त अनुभवही नाही म्हणुन आमच्या कडुन खराब क्षेत्ररक्षण होत आहे असेही तीने यावेळी नमूद केले आहे.
यावेळी वीदाने बीसीसीआयला विनंती केली असून त्यांनी महिलांचे दिवस-रात्र प्रकारातील जास्तीत जास्त सामने आयोजीत करावे जेणे करुन महिला खेळाडूंना अशा प्रकारच्या परिस्थीतींमध्ये चांगला खेळ करण्यास मदत मिळेल. यावेळी भारतीय संघातील धदाकेबाज सलामीवीर जेमिमा रॉड्रीग्जने देखील वेदाची बाजु घेत सांगितले की, आमच्या संघाने अश्या प्रकारच्या परिस्थीतींमम्ध्ये कमी सामने खेळले आहेत आणि त्याचाच परिणाम आमच्या क्षेत्ररक्षणावर जानवतोय. त्यामुळे अशा प्रकारे दिवस-रात्र प्रकारात जास्तित जास्त सामने झाल्यास त्याचा आम्हाला निश्चीतच फायदा होईल.
त्याच बरोबर तीने न्युझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये झालेल्या सामन्यांचे उदाहरण देताना सांगितले की, या दोन्ही ठिकाणी झालेल्या सामने हे सकाळी 10 ला सुरू होत होते त्यामुळे कृत्रीम प्रकाशात खेळण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. आता जास्तीत जास्त सामने कृत्रीम प्रकाशात आयोजीत क्लरावे म्हणजे आम्ही अशा परिस्थीतीशी जुलवून घेऊ शकू अशी तीने यावेळी नमूद केले.