रायपुर :- वि.दा. सावकर यांच्या जीवनाचे दोन भाग आहेत. अंदमानात शिक्षा भोगायला जाण्यापुर्वी ते प्रखर क्रांतीकारक होते हे खरे आहे, पण अंदामानातून सुटून आल्यानंतर मात्र ते पुर्ण बदलले आणि ते ब्रिटीश धार्जिणे झाले असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे.
राहुल गांधी यांच्या सावरकरांच्या विधानांविषयी वादंग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत अनेक जण तुरूंगात गेले. पण बाळ गंगाधर टिळक, सरदार भगतसिंग, गांधी, नेहरू किंवा पटेल यांच्यापैकी कोणीही ब्रिटीशांची माफी मागितली नव्हती. पण सावकर यांनी मात्र ब्रिटीशांना माफीनामा लिहून देऊन स्वत:ची सुटका करून घेतली हा इतिहासच आहे.
अंदमानात शिक्षा भोगायला जाण्यापुर्वी सावरकर क्रांतीकारकच होते ही वस्तुस्थिती आहे. पण त्यानंतर मात्र त्यांनी ब्रिटीशांना माफीपत्र लिहून दिल्यानंतर ते पुढील काळात ब्रिटाशांसाठीच काम करताना दिसून आले. अंदामानातून सुटून आल्यानंतरची त्यांची भूमिका क्रांतीकारकाच्या भूमिके पेक्षा नेमकी उलटी होती. त्यामुळे त्यांचे आयुष्य हे दोन भागात विभागाल्याचे दिसून येते असे बघेल म्हणाले.
Money laundering case : सचिन वाझेला न्यायालयाचा दिलासा, जामीन मंजूर मात्र…
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत सावरकर यांनी ब्रिटीशांना लिहीलेल्या माफीपत्राची प्रतच सादर केली आणि त्यात सावरकर यांनी नेमके काय म्हटले आहे हे पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. आपण ब्रिटीशांचे आज्ञाधारक सेवक म्हणून येथून पुढे काम करू असेही सावरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केल्याचा दाखलाही राहुल गांधी यांनी दिला होता. त्यामुळे देशभरच मोठे वादंग माजले आहे. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या या विधानांवरून आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.