नवी मुंबई – वाशी टोलनाक्यावर झालेल्या तोडफोडप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले होते. यानुसार राज ठाकरे आज न्यायालयात हजर झाले. याप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर केला आहे.
वाशीमध्ये 26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने आता वॉरंट जारी केले होते. आज हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. अखेर आज राज ठाकरेंनी न्यायालयात हजर राहत जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मे रोजी होणार आहे आणि त्यावेळी राज ठाकरेंना न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.
दरम्यान, न्यायालयात सुनावणीपूर्वी जाण्याच्या एक दिवसआधी मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. ‘शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच…!, असा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.
शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय्य-हक्कांसाठी घुमणारच…!
सन्मा. राजसाहेब ठाकरे ह्यांना नवी मुंबई न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश.
शनिवार, ६ फेब्रुवारी २०२१, सकाळी ११ वा.
स्थळ : बेलापूर न्यायालय, नवी मुंबई.#महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/RorE6IiFwF— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 5, 2021