नवी दिल्ली – देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशात युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांनी आज डिजिटल पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
केजरीवाल म्हणाले, करोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज आहे. लस तयार करण्याचे काम फक्तदोन कंपन्यांकडे आहे, ते वाढविण्यात यावे.
सध्या आपण दररोज सव्वा लाख डोस देत आहोत, हे लाख डोस रोज करण्याचे लक्ष्य आहे. परंतु एक मोठी समस्या समोर येत आहे, ती म्हणजे लस. आमच्याकडे फक्त काही दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक आहे आणि ही समस्या देशभर आहे. अशी काही राज्ये आहेत जिथे लस नसल्यामुळे लसीकरण सुरू झाले नाही. देशात केवळ दोन लस उत्पादन कंपन्या आहेत. ज्या महिन्यात सहा ते सात कोटी लस बनवतात. मात्र, आता लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाण्याची आवश्यकता आहे.