रांची – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षाला उत्तराखंडमध्ये जोरदार झटका बसला आहे. राज्याचे मंत्री यशपाल आर्य आणि त्यांचे आमदार पूत्र संजीव यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
सहा वेळा आमदार असणारे यशपाल आर्य हे प्रख्यात दलित नेते आहेत. ते पुष्करसिंह धामी मंत्रीमंडळात वाहतूक मंत्री होते. त्यापुर्वी ते उत्तराखंड कॉंग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री हरिष रावत यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून त्यांनी पक्ष बदल केला होता असे सांगण्यात येत होते. मात्र, कॉंग्रेसने त्यांचे पूत्र संजीव यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना नैनितालमधून उमेदवारी दिली. त्यात ते विजयी झाले, हे मुख्य कारण असल्याचे बोलले जाते.
धामी यांना मुख्यमंत्री बनवल्याने धामी अस्वस्थ होते. धामी आर्य यांच्या निवासस्थानी त्यांची समजूत काढण्यासाठी 25 सप्टेंबरला स्वत: गेले होते. त्यावेळी उभय नेत्यांनी एकत्र अल्पोपहार घेतला होता, असे सूत्रांनी सांगितले.