लखनौ, दि. 6 -उत्तरप्रदेशला आम्ही पोलादी सरकार दिले होते तशाच स्वरूपाच्या सरकारची आज उत्तरप्रदेशला गरज असून लोकांना त्याची जाणीव आहे त्यामुळे मतदार यावेळी बसपालाच बहुमत देतील असा विश्वास बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी व्यक्त केला आहे.
गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करत असलेले उपेक्षित लोक त्यांच्या मतांच्या बळावर आपले आणि राज्याचे नशीब बदलण्याचे काम करू शकतात.हा बदल त्यांनी घडवून आणला पाहिजे.
काहीं पक्षांनी अच्छे दिन चे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या काळातच स्थिती अधिक बिघडली आहे त्यामुळे अशा पक्षांच्या शब्दांमध्ये न गुंतणेच शहाणपणाचे ठरेल असेही मायावती यांनी म्हटले आहे.