पुणे – अवकाळीमुळे ऊस उत्पादनातील घटीचा थेट परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. आतापर्यंत एकट्या उत्तर प्रदेशात 10 लाख टन उत्पादन झाले आहे. यंदा राज्यात सुरू झालेला गाळप हंगाम लक्षात घेता यावर्षी साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडी घेणार असल्याचे चित्र आहे.
साखर उत्पादनात देशातील उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये कमालीची चुरस असते. मात्र, यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना महापूर आणि अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादन मोठ्या प्रमणावर घटले आहे.
देशातील गाळप हंगाम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला असून, त्यामध्ये उतर प्रदेशातील 111 साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून आतापर्यंत 10.81 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामुळे देशातील गळीत हंगामात उत्तर प्रदेशने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. उत्तरप्रदेशने यंदा गतवर्षीपेक्षा साखरेचे अधिक उत्पादन घेतले असून, गेल्यावर्षी नोव्हेंबर अखेर उत्तर प्रदेशमधील 95 कारखान्यांमधून 9.14 लाख टन साखेरेचे उत्पादन झाले होते.