नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारची महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आखण्यात आलेली मिशन शक्ती अपयशी ठरली असून महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
केवळ ढोंगबाजी आणि खोट्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश सरकारने ही मिशन हाती घेतले आहे. त्यामुळे ते अपयशीच होणार होते आणि तसेच झाले आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे नोंदवून घेण्यासही तेथे महिन्या-महिन्याचा विलंब लागत असून अनेक प्रकरणे दडपून टाकली जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
भदोही येथे एका 21 वर्षीय मुलीला तिच्या घरातच काही व्यक्तींनी जिवंत जाळल्याच्या घटनेचे कात्रणही त्यांनी आपल्या ट्विटसह जोडले आहे.