लखनौ – उत्तरप्रदेश सरकारचा नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. एकूण 5 लाख 12 हजार 860 कोटी रूपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 33 हजार 159 कोटींनी अधिक आहे. त्यात नवीन योजनांसाठी 10 हजार 967 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात अयोंध्या शहराच्या विकासासाठी 85 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून तुलसी स्मारक भवनासाठी 10 कोटी रूपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. अयोध्येतील विमानतळासाठी पाचशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाराणसीतील काशी विश्वानाथ मंदिराच्या सुशोभीकरण आणि विस्तारासाठी 200 कोटी रूपयांची यात तरतूद करण्यात आली आहे. योगी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प आहे, अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी तो विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात एकूण 12 हजार 302 कोटी रूपयांची तूट आहे.