लखनऊ – उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. यात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.
एक दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील रसूलपुर गावात तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली. आधी एक मुलगा तलावात पडला, त्यानंतर एकमेकांना वाचवताना सर्व मुलांचा बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेतील सर्वाचे वय 6 ते 12 वर्षादरम्यान होते.