राजगुरूनगर : खेड तालुक्यातील रेटवडी येथील महिला शेतकरी तथा खेड पंचायत समितीच्या माजी सभापती सुभद्रा शिंदे यांनी एक एकर शेतातील कोबी पीक धनगरांच्या शेळ्या, मेंढ्याना चरण्यासाठी दिले आहे. लॉकडाऊनमुळे कोबी पिकाला भाव मिळत नाही.
तसेच अन्य बाजारपेठेत नेता येत नसल्याने त्यांनी ही भूमिका घेतली. लॉकडाऊन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही. हाताशी आलेली पिके बाजारपेठा बंद असल्याने वाया गेली आहेत. खेड तालुक्यात ‘कोबी’चे उत्पादन घेणा-या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.करोना विषाणूचा कहर सगळीकडे असल्याने बाजारपेठ बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.