कौशंबी – वाळूने भरलेला एक ट्रक एका एसयुव्ही वाहनावर उलटून झालेल्या एका अपघातात आठ जण ठार झाल्याची घटना आज या जिल्ह्यातील कडा धाम भागात घडली. ज्या एसयुव्हीवर हा ट्रक उलटला त्या गाडीतील माणसे देविगंज येथील एक लग्नसमारंभ उरकून सहजादपूर येथे परत येत होते.
या प्रकारात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून गॅस कटरचा वापर करून हे मृतदेह बाहेर काढावे लागले. या गाडीच्या खिडकीतून दोन मुली मात्र सुखरूपपणे बाहेर आल्या. त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या प्रकारानंतर ट्रक चालक फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त करीत अपघातग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्याची सूचना त्यांनी केली आहे.