नागपूर – देशात आज स्वतंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं. तर मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी भारताचा शत्रुराष्ट्र चीन संदर्भात मोठं विधान केलं.
भागवत म्हणाले की, आपण आज इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. पण ते आपल्या देशात तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला शेजारील चीन राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार आहे, असही मोहन भागवत म्हटलं.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या राजा शिवाजी महाविद्यालयात आज मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी, ते म्हणाले, आपण इंटरनेटचा वापर करतोय, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. पण हे तंत्रज्ञान आपल्याला शेजारी राष्ट्रातून मिळतं. आपण कितीही आरडाओरडा केला तरी आपल्या फोनमध्ये या ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून आलेल्या आहे. जोपर्यंत आपण चीनवर अवलंबुन राहणे कमी करणार नाही, तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार आहे