मुंबई – उन्मुक्त चंद 28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे. उन्मुक्तच्या नेतृत्वात भारताच्या क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला होता.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उन्मुक्तने ऑस्ट्रेलिया विरुद्ध फलंदाजी करताना 111 धावा केल्या होत्या. शतकी खेळीसाठी त्याला सामनावीर हा पुरस्कार मिळाला होता.
उन्मुक्त चंद याने ट्विटरच्या मालिकेतून आपण क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले. कुमार गटाचे यश त्याला वरिष्ठ संघाचा दरवाजा उघडू शकले नाही.
अखेर वरिष्ठ गटात खेळण्याच्या वाटा बंद झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. याशिवाय तो आयपीएलमध्ये सर्वात पहिली मॅच दिल्लीकडून 2011 मध्ये खेळला आणि शेवटची मॅच मुंबईकडून 2016 मध्ये खेळला.
ट्विटरच्या एकामागून एक मालिकेतून आपला निर्णय जाहिर करताना त्याने काही आठवणीतले व्हिडियो देखिल टाकले. कारकिर्दीच्या नव्या वाटा शोधण्याचा त्याचा मानस असून, त्यासाठी येथून निवृत्ती घेणे आवश्यक होते. त्यामुळेच उन्मुक्तने हा निर्णय घेतला. उन्मुक्त आता अमेरिकेत टी 20 लीग खेळणार आहे.
T2- On to the next innings of my life #JaiHind🇮🇳 pic.twitter.com/8yK7QBHtUZ
— Unmukt Chand (@UnmuktChand9) August 13, 2021
उन्मुक्त चंदचा क्रिकेटमधील प्रवास
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्ली आणि उत्तराखंड या दोन संघांचे प्रतिनिधित्व
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3379 धावा
- लिस्ट ए क्रिकेटमध्ये 4505 धावा
- टी20 क्रिकेटमध्ये1565 धावा
- आयपीएलमध्ये 21 सामने खेळून उन्मुक्तने 300 धावा
- आयपीएलमध्ये उन्मुक्त दिल्ली, राजस्थान आणि मुंबई या तीन संघांकडून प्रतिनिधीत्व