मुंबई : राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.
काल रात्री #एसटी कर्मचाऱ्यांसोबत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला.#लढा_विलिनीकरणाचा pic.twitter.com/npwVrHqGec— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 11, 2021
सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ थांबवण्यात होते. यानंतर या दोन्ही नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत अख्खी रात्रं आझाद मैदानात घालवली. कडाक्याची थंडी आणि मच्छरांचा त्रास सहन करत या दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानात संपूर्ण रात्रं जागून काढली. याबाबत गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले आहे की ,’जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. काल रात्री #एसटी कर्मचाऱ्यांसोबत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला.’ अशा कॅप्सशन सह त्यांनी फोटो शेअर केले आहे सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे.