पुणे – समर्थ पोलीस ठाणेकडून नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. विजयादशमी निमित्त समर्थ पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व बिट मार्शल तसेच महिला अंमलदार यांनी समर्थ पोलीस ठाणे संपूर्ण हद्दीत सायकल व पायी पेट्रोलींग केली. या दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापारी संकुल, नागरिक, रिक्षा स्टॅन्ड, धान्य बाजार याठिकाणी जावुन तेथील नागरिकांना दस-यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंद्रप्रस्थ येथील व्यापारी संकुलचे राजेश परमार यांनी ‘अशा प्रकारचा पोलीसांकडुन अनुभव आम्हा व्यापा-यांना प्रथमच येत असुन यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागण्यासाठी याचा निश्चीतच उपयोग होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्याचप्रमाणे राज रानावत यांनी पोलीसांच्या या उपक्रमाचे स्वागत करुन त्यांना स्वतः व नागरिकांना अशाप्रकारचा अनुभव प्रथमच येत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. रिक्षाचालक व धान्य व्यापारी हे सुद्धा पोलीसांनी दिलेल्या शुभेच्छा व राबविलेल्या उपक्रमामुळे भारावून गेले त्याचप्रमाणेच पोलीस ठाणेमध्ये देखील पोलीसांना व नागरिकांना दस-या निमित्त शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाविषयी समर्थ पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक (गुन्हे ) उल्हास कदम यांनी सांगीतले की, यामाध्यमातुन नागरिकांमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण व्हावी, पोलीस जनता संबध चांगले व्हावेत, नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे. यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला आहे.