पाटणा – बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष पॅकेज देण्याच्या मागण्यांकडे यावेळीही कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प निराशा करणारा ठरला, अशा शब्दांत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला डिवचले.
गरीब राज्यांचा विकास होणे गरजेचे आहे. अन्यथा, सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट स्वप्नच राहील, अशी प्रतिक्रिया नितीश यांनी लेखी निवेदनाद्वारे अर्थसंकल्पावर दिली. केंद्रीय अर्थसंकल्प गरिबांच्या आणि बिहारच्या हितांविरोधातील आहे. त्याबद्दल बिहारची जनता भाजपला चोख प्रत्युत्तर देईल, असे त्या राज्याचे अर्थमंत्री विजयकुमार चौधरी यांनी म्हटले.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारबरोबरच भाजपवर निशाणा साधला. बिहारने भाजप आणि मित्रपक्षांच्या शंभर टक्के उमेदवारांना लोकसभेवर निवडून दिले. पण, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बिहारी जनतेची पुन्हा फसवणूक केली.
एकापेक्षा अधिक ठिकाणांवरून निवडणूक लढण्यास बंदी नाही – सर्वोच्च न्यायालय
केंद्रात सत्तेवर येण्याआधी भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि कोट्यवधी रोजगार पुरवण्याचे आश्वासन दिले. आता अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्या पक्षाची जुमलेबाजी करण्याची सवय गेलेली नाही, असा शाब्दिक टोला तेजस्वी यांनी लगावला.