नवी दिल्ली : गुजरात आणि कर्नाटकच्या रस्ता अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुक्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
येथील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरु असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत.
West Bengal: 13 people died in an accident in Dhupguri city of Jalpaiguri district last night, due to reduced visibility caused due to fog. The injured were taken to a hospital. pic.twitter.com/HHUvqCist6
— ANI (@ANI) January 20, 2021
तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.